मुलांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे ५ महत्त्वाचे फायदे
आजचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे पण या शब्दाचा अर्थ फक्त जिंकणं किंवा हरणं एवढाच नाही. खरं तर स्पर्धा ही मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि आत्मविश्वास वृद्धीचा एक महत्वाचा टप्पा आहे. शाळा, अकॅडमी किंवा इतर क्षेत्रात मुलं जेव्हा स्पर्धांमध्ये भाग घेतात, तेव्हा त्यांचा मेंदू, विचार करण्याची पद्धत आणि भावनिक स्थैर्य या सगळ्याचा सुंदर संगम तयार होतो.
पालक म्हणून आपण अनेकदा “हरतील का?” या भीतीने मुलांना स्पर्धेत पाठवण्यास संकोच करतो, पण खरं पाहता प्रत्येक स्पर्धा म्हणजे मुलांसाठी एक नवीन शिकण्याची संधी!
नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.
तर या ब्लॉगमध्ये, मुलांनी स्पर्धेत का सहभागी व्हायला हव? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.
चला तर पाहूया मुलांनी स्पर्धेत सहभागी व्हावे यामागचे ५ फायदे:
१. आत्मविश्वास आणि धैर्याचा विकास :-
स्पर्धा ही मुलांच्या आत्मविश्वासाचा पाया घालते.
जेव्हा ते लोकांसमोर परफॉर्म करतात, प्रश्नांना उत्तरे देतात, किंवा काहीतरी सादर करतात, तेव्हा त्यांच्या मनातील भीती कमी होते. त्यांना जाणवते की “मीही करू शकतो!” जिंकले नाही तरी, त्या अनुभवातून मिळणारा आत्मविश्वास त्यांना पुढच्या प्रत्येक टप्प्यावर मजबूत करतो. हा आत्मविश्वासच नंतर त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक यशाचा गाभा बनतो.
२. शिस्त, नियोजन आणि सातत्याची सवय :-
स्पर्धेत यश मिळवायचं असेल, तर तयारी करावी लागते.
ही तयारी मुलांना वेळेचे नियोजन, नियमित सराव आणि शिस्तबद्धता शिकवते. त्यांना समजतं की यश एकाच दिवसात मिळत नाही त्यासाठी सातत्य आवश्यक आहे.
ही सवय केवळ स्पर्धेसाठी नाही तर आयुष्यभर उपयोगी पडते, मग ती शैक्षणिक कारकीर्द असो किंवा व्यावसायिक जीवन.
३. मानसिक ताकद आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती :-
स्पर्धा म्हणजे नेहमीच जिंकणं नाही. कधी कधी हारही पत्करावी लागते पण त्यातूनच मुलं शिकतात की अपयश म्हणजे शेवट नाही, ती नव्या सुरुवातीची संधी आहे. हार झाल्यानंतरही उभं राहणं, पुन्हा प्रयत्न करणं, आणि आत्मचिंतन करणं — हे गुण फक्त स्पर्धेमधूनच विकसित होतात. ही मानसिक ताकदच त्यांना भविष्यातील मोठ्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जाण्यास मदत करते.
४. संवादकौशल्य आणि सामाजिक आत्मविश्वास :-
स्पर्धांमध्ये मुलांना विविध शाळांमधील, शहरांमधील आणि पार्श्वभूमीतील मुलांशी संवाद साधावा लागतो. या माध्यमातून त्यांचं सामाजिक कौशल्य (social skills) आणि संवादकौशल्य (communication skills) नैसर्गिकरित्या वाढतं. ते टीमवर्क, सहकार्य, आणि परस्पर आदर या मूल्यांना समजतात. यामुळे मुलं अधिक आत्मविश्वासी, मैत्रीपूर्ण आणि समजूतदार बनतात.
५. प्रेरणा, प्रगतीचा आनंद आणि स्वतःला ओळखण्याची संधी :-
स्पर्धेत भाग घेतल्यावर मुलं जेव्हा आपली प्रगती अनुभवतात मग ती पारितोषिकाच्या स्वरूपात असो किंवा फक्त कौतुकाच्या शब्दांत तेव्हा त्यांना अभिमान आणि प्रेरणा मिळते. ती भावना त्यांना पुढच्या टप्प्याकडे नेते. स्पर्धा मुलांना त्यांच्या खऱ्या आवडी, क्षमता आणि ताकद ओळखण्याची संधी देते. काही मुलं वक्तृत्वात तर काही गणितात, काही कला किंवा क्रीडेत उजवतात आणि ही ओळख त्यांच्या भविष्यातील वाटचालीला दिशा देते.
स्पर्धा म्हणजे शिक्षणाचा जिवंत अनुभव स्पर्धा ही केवळ पारितोषिकासाठी नसते, ती विकासासाठी असते. जिंकणं छान असतं, पण त्याहूनही मोठं असतं प्रयत्न करणं!म्हणून प्रत्येक पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावं. कारण प्रत्येक स्पर्धा त्यांना थोडं अधिक सक्षम, आत्मविश्वासी आणि आनंदी बनवते! 🌟
लक्षात ठेवा:
”स्पर्धा म्हणजे केवळ जिंकणं नाही, तर घडणं आहे! आणि स्पर्धा म्हणजे इतरांशी नव्हे, तर स्वतःशी केलेली सुंदर शर्यत आहे.”
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.
धन्यवाद!!
जया सकपाळ.
(VES Abacus Program Director)






Khup chaan 👌
ReplyDeleteKhup sundar madam
ReplyDeleteWahh wahhh nice blog
ReplyDeleteधन्यवाद मॅडम !!!! तुम्ही दिलेली माहिती खूप मुलांसाठी उपयोगी आहे. ही माहिती आम्ही मुलांना वेळोवेळी समजावून देण्याचा प्रयत्न करू जेणे करून मुल उत्स्फूर्तपणे स्पर्धेमध्ये भाग घेतील.😊
ReplyDeleteधन्यवाद जया मॅडम खूपच छान अशी तुम्ही माहिती सांगितली अबॅकस विषयी खरोखरच या स्पर्धेच्या युगात या सर्वांची गरज आहे आणि ही माहिती मुलांना फायदेशीर होणार आहे धन्यवाद
ReplyDeleteKadak Blog Writing .....
ReplyDelete